बीड

बीडसह जिल्ह्यात दोन दिवस ढगाळ वातावरण, शेतकरी चिंतीत

बीड – तामिळनाडू राज्यात आलेल्या फेंगल चक्रीवादळामुळे सध्या महाराष्ट्रातही पावसाळी वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी रविवारी व सोमवारी ढगाळ वातावरण होते आणि त्यामध्येच थंडीही जाणव होती.

तामिळनाडू राज्यात आलेल्या चक्रीवादळाचा परिणाम हा महाराष्ट्रावरही जाणवला असून रविवारी व सोमवारी असे दोन दिवस बीड जिल्ह्यातही ढगाळ वातावरण होते, जिल्ह्यांमध्ये यामुळे अनेक पिकांना याचा फटका बसेल असे बोलले जात असल्याने शेतकरी चिंतेत दिसून आला आहे.

रविवारी व सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरणामुळे धुक्याचे प्रमाणही वाढले होते. सकाळी थंड वातावरण होते परंतु दुपारीही सूर्यदर्शन झाले नसल्याने वातावरणात गारठा कायम राहिला.

जिल्ह्यात मंगळवारी सकाळी सूर्य दर्शन झाल्याने दोन दिवसाचे ढगाळ वातावरण निवळले, तरीही काही ठिकाणी थंड वातावरण व मधूनच ढगाळ वातावरण दिसून आले. या ढगाळ वातावरणाचा परिणाम अनेक पिकांवर आणि फळबागांवरही दिसून आला आहे. यामुळे शेतकरी अजूनच अडचणीत येईल असे बोलले जात आहे.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button