महाराष्ट्र

हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार – फ डणवीस

मुंबई – राज्यात गुरुवारी महायुतीच नवीन सरकार स्थापन झाल असून सुरुवातीला मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे परंतु संपूर्ण मंत्रिमंडळ अजून स्थापन व्हायच आहे आणि ते हिवाळी अधिवेशनाच्या आधी पूर्ण होईल अशी माहिती राज्याचे नुतन मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांनी दिली.


गुरुवारी आझद मैदानावर राज्याचे नुतन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फ डणवीस आणि एकनाथ शिंदे व अजीत पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या छोटयाश्या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रिय मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री उपस्थित होते.


नुतन मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांंशी संवाद साधताना एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, हिवाळी अधिवेशनाच्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. यासाठी तीनीही पक्षांच्या प्रमुखांची जवळपास बोलणी पूर्ण झाली आहे आणि मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर खातेवाटपही जाहिर होईल. राज्यात मतमोजणी 23 नोव्हेंबरला झाली होती आणि तब्बल 13 दिवसानंतर सरकार स्थापन झाले आहे.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button