महाराष्ट्र

शिवशाही बसला भीषण अपघात 10 प्रवासी जागीच ठार

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. भंडारा- गोंदिया शिवशाही बसला हा अपघात झाला असून त्यात सुमारे 10 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 30 ते 35 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.आज शुक्रवारी सकाळी भंडारा आगारातून सुटलेल्या शिवशाही बसचे गोंदियाला जात असताना सडक अर्जुनी मार्गावर बिंद्रावन टोला गावाजवळ नियंत्रण सुटले. यामुळे बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. या अपघातात आतापर्यंत 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 30 ते 35 जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना गोंदिया जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button