महाराष्ट्र

विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरू

मुंबई – महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आज दिनांक 3 मार्च पासून सुरू झाले आहे पहिल्या दिवशी राज्यपाल सी राधाकृष्णन यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले. मंडळाची सुरुवात आज संयुक्त बैठकीने मुंबईतील विधानभवनामध्ये सुरू झाली यावेळी सर्व विधिमंडळ सदस्य उपस्थित होते. सत्ताधारी व विरोधी पक्षांनी या आदेशनासाठी कंबर कसलेली दिसली आहे. चहापाण्याच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने मुद्द्यांवर आक्रमक होत बहिष्कार घातला होता आज सोमवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जोरदार घोषणाबाजी केली गेली विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरणारे मुद्दे उपस्थित करून घेरले. सकाळी अधिवेशन सुरू व्हायच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या दोन्ही हातामध्ये बेड्या घालून आले व त्यांनी सरकारचा जाहीर निषेध केला. या अधिवेशनात सरकारकडून विविध प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत व त्याचे कायद्यात रूपांतर केले जाणार आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे या या सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडणार आहेत यामधील विविध योजनांसाठीची तरतूद कशी करेल याकडे विरोधी पक्षांचे लक्ष लागले आहेत विशेषतः लाडकी बहीण योजनेसाठी जी तरतूद करायची आहे त्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार याकडे जनतेचे आणि राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे हे अधिवेशन वादळी ठरेल की काय असा प्रश्न विचारला जात आहे

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button