मनोरंजन

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका 30 तारखेला प्रेक्षकांचा निरोप घेणार

स्टार प्रवाह या वाहिनीवर मागील चार वर्षापासून सुरू असलेली आणि घराघरात पोहोचलेली व महिलांना आवडती असलेली आई कुठे काय करते ही मराठी मालिका आता 30 नोव्हेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अरुंधती ही भूमिका साकारणारी मधुराणी प्रभुलकर हिने ज्या संकटांना तोंड देत आपली कर्तव्य पार पाडले त्यामुळे मराठी विश्वातील मालिकांमध्ये ही मालिका अधिक प्रमाणात घराघरात व महिलांवर अधिराज्य गाजत राहिली होती परंतु 30 नोव्हेंबरला ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अर्थात ही मालिका आता संपणार असल्याने मालिकेतील कलाकार आणि चाहते सुद्धा भावूक झालेले दिसून आले

मालिकेतील अरुंधती ची भूमिका करणारी कलाकार मधुराणी प्रभुलकर ही या मालिकेमुळे घराघरात पोहोचली होती याचबरोबर संजनाची भूमिका करणारी रूपाली भोसले, अनिरुद्ध ची भूमिका करणारा मिलिंद गवळी,यश ची भूमिका करणारा अभिषेक देशमुख, अशितोष ची भूमिका करणारा केळकर अनघाची भूमिका साकारणारी अश्विनी महांगडे व इतर कलाकार यांनी सुद्धा आपल्या भूमिकेला खूप चांगल्या प्रकारे न्याय दिलेला दिसून आला 19 डिसेंबर 2019 पासून ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू होती परंतु 30 नोव्हेंबरला ही मालिका आता संपणार आहे

या मालिकेतील सर्व कलाकारांनी अतिशय उत्तम रित्या काम केले आणि त्यांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिलेला आहे या मालिकेचे शीर्षक गीत ठाकूर यांनी लिहिले तर अवधूत गुप्ते यांनी ते संगीतबद्ध केले आर्या अंबेकरने ते गायले आहे. या मालिकेमुळे सर्व कलाकार एकत्र आले आणि त्यांनी चार वर्षाचा प्रवास पूर्ण आनंदाने आणि सहकारी वृत्तीने केलेला दिसून आला आता ही मालिका संपत असल्याने महिला वर्ग सुद्धा नाराज दिसून येत आहे आणि भावूक सुद्धा झालेला आहे मालिकेतील सर्व कलाकार आणि त्यांचे चाहते यांचे एक वेगळे नाते यामुळे निर्माण झाले होते पण आता ही मालिका संपत असल्याने या मालिकेतील कलाकरावरील प्रेम चाहते कधीही विसरणार नाहीत.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button