क्रीडा

भारताचा भूतानवर जबरदस्त विजय, टीम इंडिया क्वार्टरफायनलमध्ये

नवी दिल्ली: भारताच्या खोखो संघाने विश्वचषक २०२५मधील चौथ्या सामन्यात सलग विजय मिळवला आहे. भारतीय पुरुष संघाने भूतानला ७१-३४ असे हरवत जबरदस्त विजय मिळवला.

पहिल्या टर्नमध्ये भारताने ३२ गुण मिळवले होते. तर प्रतिस्पर्धी संघ भूतानने केवळ १८ गुण मिळवले होते. त्यानंतर दुसऱ्या टर्नमध्ये भारताने आपली गुणसंख्या ७१ पर्यंत वाढवली. तर भूतानला केवळ ३४ धावांपर्यंत मजल मारता आली.

या विजयासह खोखो वर्ल्डकप २०२५मध्ये भारतीय पुरुष संघ क्वार्टरफायनलमध्ये पोहोचला आहे. याआधी भारताने तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला होता.

वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात भारताने नेपाळला ४२-३७ असे हरवले होते. खरंतर नेपाळने पहिल्या सामन्यात भारताला चांगली टक्कर दिली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने ब्राझीलला ६४-३४ असे हरवत पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवले होते. त्यानंतर आता भारतीय संघाने विजयी हॅटट्रिक लावली आहे. तिसऱ्या सामन्यात त्यांनी पेरूला हरवले. यासोबत भारतीय संघाने ३ सामन्यांतून ६ गुण मिळवले आहेत. भारत ग्रुप ए मध्ये खेळत आहे. यासोबतच भारताने ग्रुप एमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button