बीड

राख वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवाच्या धडकेत सरपंचाचा मृत्‍यू

परळी – भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्परने मोटार सायकल वरून जाणाऱ्या सरपंचाला जोराची धडक दिली यामध्ये गाडीचा चक्काचूर झाला. तर सरपंचाचा जागीच मृत्यू झाला.
औष्णिक वीज केंद्रातून निघणाऱ्या राखेत मोठ्या प्रमाणावर अर्थकारण दडलेलं असल्यामुळे अजूनही राख माफिया बिनधास्त राखेची वाहतूक करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सौंदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे शनिवारी रात्री आपल्या गावाकडचे शेतीचे काम उरकून परळी कडे जात असताना मिरवट फाट्याजवळ राख वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्पर क्रमांक एमएच-44 – 2117 ने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये मोटार सायकल क्र एमएच 23 – 7125 चा चक्काचूर झाला तर मोटार सायकल स्वार सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. टिप्पर चालक मात्र टिप्पर घटनास्थळी ठेवून फरार झाला.

अपघात झाल्याचे समजताच नागरीक घटनास्थळी दाखल होत नागरीकांनी अपघातग्रस्ताला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सरपंचाला टिप्परने धडक दिल्यामुळे हा अपघात होता की घातपात होता या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

WhatsApp Group