बीड

बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरण

बीड – बीड शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी संपूर्ण दिवस सूर्यदर्शन झाल नाही आणि दिवसभर ढगाळ वातावरण राहिल आहे. यामुळे पिकांवर परिणाम झाला असल्याच बोलल जात आहे आणि थंडी अचानक गायब झाली आहे.
राज्यात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्टयामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे आणि देशात आलेल्या शीतलहरीमुळे यात अजूनच भर पडली आहे. शुक्रवारी बीडसह जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते आणि पावसाची शक्यताही वर्तवली जात होती. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे जनजीवनही विस्कळीत झाले असून थंडीच प्रमाण मात्र अचानक कमी झाल आहे. अश्या या ढगाळ वातावरणात पावसाच्या सरी कोसळतील असे हवामान तज्ञानी सांगितले होते परंतु बीड जिल्ह्यात दुपार पर्यंत पावसाची कोणतीही नोंद करण्यात आली नाही.
राज्यातील काही भागात पावसाच्या सरी
बीड जिल्ह्यात जरी शुक्रवारी पाऊस आला नाही तरी राज्यातील अनेक भागात विशेषतः खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार या ठिकाणी पावसाच्या सरळी कोसळ्या आहेत त्यामुळे काही प्रमाणात पिकांना याचा फ टका बसला आहे. द्राक्षे, मोसंबी यासह काही पिकांवर याचा परिणाम झाला आहे.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button