ताज्या बातम्याबीड

महाराष्ट्रात मस्साजोग सारख्या घटना दुर्दैवी – शरद पवार

केज दि.२१ – महाराष्ट्रामध्ये मस्साजोग सारख्या घटना घडणं हे अत्यंत दुर्दैवी असून या घटनेची सखोल चौकशी होऊन यामध्ये जे दोषी असतील त्यांना कडक शासन होणे गरजेचे आहे. असे स्पष्ट मत जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. त्यांनी मसाजोग येथील देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही मसाजोग येथे शनिवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणं हे अत्यंत दुर्दैवी असून महाराष्ट्रासाठी ही शरमेची बाब असल्याचे बोलून दाखवले. उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन यातील दोषींना कडक शासन होईल असे प्रयत्न करावेत. एवढेच नव्हे तर संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाची ही जबाबदारी आम्ही घेत असल्याचे यावेळी सांगितले. आणि त्यांच्या कुटुंबियांना आम्ही सर्वजण मिळून आधार देत आम्ही खंबीरपणे देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी उभे असल्याचाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button