बीडक्राईममहाराष्ट्र

चुकीला माफी नाही! बीडच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांची उचलबांगडी

बीड – केज तालुक्यातील मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे कोणी आरोपी सहभागी असतील त्याच्यासह प्रकरणाच्या मुख्यसूत्रधाराला सोडले जाणार नाही आणि या प्रकरणात हलगर्जीपणा करणार्‍या जिल्हा पोलिस अधीक्षकांची बदली करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी विधानसभेत दिले.
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने पूर्ण बीड जिल्हा हादरला होता आणि पवनचक्कीचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर त्यांच्या हत्येतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती, परंतु या प्रकरणाचा संपूर्ण तपास करुन आरोपीना शिक्षा दिली जावे यासाठी जिल्हाभर आंदोलने केली गेली तसेच मागील चार दिवसापासून अनेक आमदारांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करत मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाची मागणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर विधानसभेत निवेदन देत म्हटले की मस्साजोगमधील संतोष देशमुख यांच्या हत्येची गंभीर दखल घेतली असून प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button